Friday, May 11, 2012

श्लोक आठवा



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मागील श्लोकापासून स्वामी 'काय करावे ?' ते सांगताहेत. या आठव्या श्लोकातही स्वामी तेच सांगतात. श्लोक आठवा असा आहे :

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ।
मना सज्जना हेची क्रिया धरावी ।।
मना चंदनाचे परी तवा झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।

(तिसर्या ओळीत 'तवा' हा शब्द 'त' ला 'वा' जोडून आहे या ब्लोग च्या छपाइत मला हे लिहिणे जमले नाही, क्षमस्व, त्यास पर्याय म्हणून तुवा हा शब्द लिहावासा वाटला पण धजले नाही)

तर 'काय केले' म्हणजे आपसुक षड्रिपुंची बाधा होणार नाही आणि त्याच बरोबर देह सत्कारणी लागेल हे या श्लोकात अत्यंत आदर्श पद्धतीने वर्णिले आहे. पहिल्याच ओळीत सगळ्याचे सार सामावले आहे. हे मना तू सतत असे काही करीत राहा कि जेणेकरून तुझ्या पश्चात तुझी कीर्ती उरेल. काय केल्याने हे होईल? अर्थात चांगले काम केल्याने! तेव्हा तू नेहमी चांगले काम करीत राहा. सामान्यपणे आपण चांगलेच कार्य करीत असतो पण ते जर लोककल्याणार्थ असेल तर त्याने करणार्याची कीर्ती होते. तर असे कार्य तू करीत राहा.

पुढच्या चरणात स्वामी याचे अजून सविस्तर स्वरूप सांगतात. लोककल्याणार्थ काम करणे म्हणजे दाम खर्चून प्रतिष्ठेसाठी काम करवून घेणे नाही तर ते निस्वार्थपणे नेटाने करणे. या दोन अत्यंत विरुद्ध गोष्टी आहेत. आपला पैसा खर्चून काम करवून घेण्याने आपला अहं वाढतो तर ते स्वत: नेटाने निस्वार्थपणे करण्याने अहम कमी होण्यास मदत होते. हे समजावून सांगताना स्वामी चंदनाची सुगंधी उपमा देतात. जसे चंदन स्वत: झिजते व लोकांस सुगंध देते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे तसे करताना त्या चंदनाला त्याच्या मोठेपणाचा, निस्वार्थीपणाचा  स्पर्शही नसतो. म्हणजे लोककल्याणार्थ तू झिजत राहा पण त्याचा अहम तुला बाधणार नाही याची दक्षता तू घे. 

असे केल्याने अशा कामाचे फलस्वरूप म्हणून तुझी कीर्ती उरेल. कीर्ती हे कामाचे फळ आहे उद्देश नाही हे अधोरेखित करावे लागेल. असे काम करण्याची सूचना समर्थ आपणास करीत आहेत.

आता कुणी लोककल्याणार्थ झिजत राहिला तर त्याने काय होईल? तो अहंकाराच्या अग्नी पासून लांब राहील पर्यायाने तो शांत होईल. स्वाभाविकपणे एखाद्या शीतल वस्तू जवळ दुसरी वस्तू ठेवली तर भावाकर्शनाने ती देखील शीतल होईल. तद्वत सतत निस्वार्थ पणे कार्यरत असेलेल्या निगर्वी मनुष्या जवळ असलेली माणसे देखील निवविली जातील आणि यात खरे काय ते लोककल्याण घडेल. हे मना, असे कार्य तू कर असे केल्याने तुझेही कल्याण होईल असे समर्थ आपल्याला सांगताहेत.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

Sunday, September 18, 2011

श्लोक ७

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पाचव्या आणि सहाव्या श्लोकात अनुक्रमे पाप संकल्प व त्याचे परिणाम सांगितल्या नंतर श्री सदगुरू समर्थ रामदास स्वामी याउप्पर काय करावे ते यापुढील श्लोकांत सांगतात. वरील श्लोकात केलेल्या अभ्यासा नंतर स्वाभाविकपणे वाचकाच्या मनात एक अस्वस्थता जागृत होते. अशा अस्वस्थ परंतु जिज्ञासू मनाला स्वस्थ करण्यासाठी पुढील श्लोकांत उपदेश केलेला आहे.

श्लोक ७ वा : श्रीराम समर्थ श्रीराम

मना श्रेष्ट धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे ||
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे || श्रीराम ||

अस्वस्थ मनाला स्थैर्य देण्यासाठी समर्थ पहिल्याच ओळीत त्याला धैर्याचा उपदेश करतात. परिस्थिती बिकट असली कि मन त्याचे स्थैर्य सोडू पाहते. अशा वेळी श्रेष्ट असलेल्या धैर्याची कास मनाने धरली पाहिजे. हे धैर्य (धारिष्ट) श्रेष्ठ का आहे? कारण त्याच्या कडे डळमळीत झालेल्या मनाला पुन्हा आश्वस्त करून उभे करण्याचे सामर्थ्य आहे. तर हे मना तू सर्व प्रथम धीर धर.

अनेक दोषांचे उगमस्थान असलेल्या वाचा व बुद्धी यांना शमवण्याचे पर्याय समर्थ पुढे सांगतात. हे मना तू नेहमी सहनशील राहा. इतरांच्या कटू शब्दांचा तू धीराने, शांतपणाने आणि सोशिकतेने स्वीकार कर. कटू शब्दांचा तू असा स्वीकार केल्याने तुझ्या स्थैर्याचा भंग होणार नाही.

तसेच पुढीलांना बोलताना तू स्वत: नेहमी नम्र भाषेचा वापर कर. 

असे का? अशाने काय होईल? तर कटू शब्द धीराने ऐकून घेतल्याने तसेच आपण नम्र भाषेत बोलण्याने क्रोध, मद, मोह व मत्सर या दोषांचे दमन होईल व त्यांच्या परिणामा पासून आपण अलिप्त राहू शकू.

अशा प्रकारे अलिप्त झालेले मन आपल्या वाणीने इतरांना सुद्धा शांत करू शकते तथापि आपण सर्वांना निवविण्याचा (शांत करण्याचा) प्रयत्न करावा.

आपल्या अशा वर्तनाने आपला विवेक (चांगले वाईट ठरविण्याची व चांगल्याच्या स्वीकाराचा आग्रह धरणारी बौद्धिक क्षमता) जागृत होण्यास, बळकट होण्यास सुरुवात होते.

व्यवहारामध्ये या सोशिकतेचा आणि नम्र भाषेचा अत्यंत उपयोग होतो. हा स्वानुभव आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Thursday, September 15, 2011

श्लोक ६

|| जय जय रघुवीर समर्थ || 

मागील श्लोकात पाप संकल्पाचे परिणाम आपण पहिले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकृतींचा प्रादुर्भाव पहिला. आज या सहाव्या श्लोकात या विकारांचे स्वरूप वर्णन पहावयास मिळेल.

श्लोक ६ वा : श्रीराम समर्थ श्रीराम

नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम ना ना विकारी ||
नको रे मना लोभ हा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भरू || श्रीराम ||

सत्याचा संकल्प सुटला कि त्याची जागा पाप संकल्प घेणार. म्हणजेच आपण व्यवहार्य असे निसर्ग नियम मोडले कि त्यातून विकार हे उद्भवणार. हे विकार जरी कायिक - म्हणजे शारीरिक व्याधी असोत, वाचिक - म्हणजे आपल्या बोलण्यातील अशुद्धी, अपशब्द किवा छाद्मिपणा असोत, मानसिक - म्हणजे मनात येणारे वाईट  विचार असोत किंवा सांसर्गिक - म्हणजे एकमेकांच्या सहवासाने पसरणारे असोत, यांचा उगम होतो तो मनात. मनात उत्पन्न होणाऱ्या या विकारांचे सामान्य पणे वर्गीकरण केले जाते ते ६ दोषात.

हे सहा दोष म्हणजे : काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. हे सहाही दोष माणसाचे शत्रू आहेत, त्यांच्या मुळे माणसाचे अध:पतन होते म्हणून त्यांना 'षड्रिपू' (सहा रिपू, रिपू म्हणजे शत्रू) असे म्हटले आहे. या सहा दोषांना उद्देशून त्यातील काही दोषांचे संदर्भ या श्लोकात घेतले आहेत.

पहिल्या ओळीत मनास म्हटलेय कि हे मना तू खेदकारी अशा क्रोधाला थारा देऊ नकोस. असे आहे, क्रोधाची उत्पत्ती भयातून / भीतीतून होते. ज्या ठिकाणी सत्य व सामर्थ्य नाही तिथे भय निर्माण होते व सामर्थ्या अभावी त्याचे रुपांतर क्रोधात होते. क्रोध हा मनाला आंधळा बनवतो व अशा आंधळ्या मना कडून चूक घडते. सरते शेवटी या सर्व प्रक्रियेतून माणसाला खेद / खिन्नता प्राप्त होते. म्हणून मनाला हि विनंती आहे कि कुठल्याही परिस्थितीत तुझ्या ठायी क्रोधाला जागा देऊ नकोस.

दुसऱ्या ओळीत काम दोषाचे वर्णन येते. काम म्हणजे आसक्ती असणे. मग ती कुठल्याही बाबतीत असो. साधी गोष्ट, भूक लागली कि खावेसे वाटते असे हे कामाचे अगदी मूळ स्वरूप आहे. सामान्यपणे शरीर सुखाची आसक्ती हे कामाचे प्रमुख लक्षण मानले जाते. काम हा असा दोष आहे कि याच्या पाई माणूस इतर अनेक दोषांचा धनी बनतो. त्यामुळे हे मना या नाना विकारी कामाला तू लांब ठेव.

आता कामाचे स्वरूप - कुठल्याही गोष्टीची आसक्ती - पाहिल्यावर त्याच्या मुळे उत्पन्न होणाऱ्या इतर दोषांचा प्रादुर्भाव लक्षात घेणे प्राप्तच आहे. मघाचेच उदाहरण पाहू. भूक लागली कि खावेसे वाटते हा काम. पण म्हणून दररोज भूक लागली कि माणूस भाजी पोळीच खातो का? तसे पहिले तर भाजी पोळी खाऊन त्याचे पोट भरणारच असते पण त्याला 'पुरणपोळी' खावीशी वाटते! भाजी पोळी वरून पुरणपोळीवर नेणारा तो लोभ. उदाहरणावरून कळते कि काम नसला तर लोभ असणार नाही म्हणजेच काम हा इतर दोषांना आमंत्रण देणारा   दोष होय. गम्मत म्हणजे कामाने लोभाला पाचारण करून तो मोकळा झाला. आता लोभाचे दुष्परिणाम पहा. जिथे भाजी पोळी खाऊन पोट सुखी होणार होते तिथे ते पुरणपोळी खाऊन बिघडणार! तात्पर्य जो लोभाला जवळ करतो त्याला 'अति तेथे माती'चे दुष्परिणाम भोगणे प्राप्त आहेच. तेव्हा हे मना तू अशा लोभाचा कधीही स्वीकार / अंगीकार करू नकोस.

आता मूळ श्लोकात नसले तरी मधल्या दोन दोषांचाही - मद, मोह- विचार आपण करू. 

लोभाचे पर्यवसान 'अति' मध्ये होते. ज्या गोष्टीचा माणूस लोभ करतो ती गोष्ट त्याच्याकडे अतिप्रमाणात आढळते. आणि अशा अतिरेकाचा परिणाम उन्मत्ततेत होतो. मला भाजी पोळीची भूक असली म्हणून काय झाले मी तर हवी तेव्हा पुरणपोळीही खाऊ शकतो. या दोषाचे स्थान अत्यंत घातक असे आहे. ज्या प्रमाणे एखादा मदोन्मत्त हत्ती जेव्हा मोकाट सुटतो तेव्हा तो अपार विध्वंस करतो तसेच त्याला कोणीही अडवू शकत नाही त्याप्रमाणे उन्मत्त / मदाने व्याप्त असलेल्या माणसास त्याच्या विध्वन्सापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. अनेकदा तर अशा माणसांचा अंतही होतो त्यांच्या मदा मुळेच. भस्मासुराच सुंदर उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे.

आपल्या ठायी निर्माण झालेल्या मदा मुळे माणसात उन्मत्तपणा, गर्व किंवा अहंभाव वृद्धिंगत होतो. माणूस स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागतो. जेव्हा त्याला अशीच आणखी माणसे दिसतात तेव्हा स्पर्धा सुरु होते. मग दुसऱ्यापेक्षा जास्त मला कसे मिळेल याची विवंचना सुरु होते हा मोह. भाजी पोळीच्या भुकेसाठी माझ्याकडे हवी तेव्हा पुरणपोळी मिळते, ती मी कितीही खाऊ शकतो पण जेव्हा दुसरा कोणी पंच पक्वान्न खात असेल तेव्हा मला तेच किवा त्याहीपेक्षा चांगले कसे मिळू शकेल हा विचार म्हणजे मोह. सामान्यपणे आज जी भौतिक प्रगतीची स्पर्धा दिसून येते तो मोहचाच वाढता परिणाम होय. अर्थात वाढत्या मोहाने आजचे जीवनमान कसे ढासळलेले आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.

पुन्हा मूळ श्लोकाकडे येताना अखेरची ओळ ज्यात अखेरचा दोष चर्चिला आहे त्याकडे वळू. पाचव्या दोषात निर्माण होणारी चढाओढ परस्परात इर्षा निर्माण करते. कधी प्रसंगी मोहापोटी हवी असलेली वस्तू नाही मिळू शकली तर मनात रोष निर्माण होतो. ज्याच्याशी स्पर्धा आहे, ज्याच्याकडे ती वस्तू आहे त्याच्या बद्दल मनात कटू भाव निर्माण होतात, तो मत्सर. मी पुष्कळ प्रयत्न करून देखील मला जेवावयास पंच पक्वान्न मिळाले नाहीत आणि दुसरा कुणी खुशाल पणे ते खातो आहे तर मला ते खुपेल, मला माझी पुरणपोळी देखील गोड लागणार नाही. तसेच अशावेळी अवमानित झालेली मनस्थिती अपमान सहन करू शकत नसल्याने अपमान लपविण्यासाठी ढोंग करू लागते. मी म्हणतो माझी पोळी त्या पंच पाक्वन्नापेक्षाही सरस आहे वगैरे. वास्तविक पाहता ती मला आता भाजी पोळी इतकीही चांगली वाटत नाही. तात्पर्य मत्सरापोटी मी दंभ करू लागतो. तेव्हा हे मना अशा दंभ कारक मात्सारालाही तू लांब ठेव.

रात्रंदिवस मनुष्य षड्रीपुंना सामोरे जात असतो. या दोषांचा त्याग करणे देह असेपर्यंत अत्यंत कठीण आहे. परंतु श्री समर्थांच्या सुचणे प्रमाणे आपण आपल्या मनास या दोषांपासून निरंतर परावृत्त करीत राहिलो तर आपण पुष्कळ मोठ्या संकटांपासून लांब राहू हे खरे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Friday, September 9, 2011

श्लोक पाचवा

जय जय रघुवीर समर्थ !

आता ब्लॉगर नव्या रुपात येऊ घातलाय आणि बऱ्याच प्रतीक्षे नंतर देवनागरीत लिहिणे शक्य झालेय. म्हणून मायबोलीत लिहितोय.

चला तर, आज श्लोक पाचवा पाहूया.

श्रीराम समर्थ श्रीराम | श्लोक पाचवा

मना पाप संकल्प सोडोनी द्यावा |
मना सत्य संकल्प जीवी धरावा ||
मना कल्पना ते नको विषयाची |
विकारे घडे हो जनी सर्व ची ची || श्रीराम ||

समर्थांनी अत्यंत मुलभूत गोष्टींना धरून इथे मनाला नम्र सूचना केली आहे. ते मनाला सुचवतात कि तु पाप संकल्प सोडावास आणि सत्य संकल्प जतन कारावास.

आता पाप हे असत्याचे प्रतिक आहे. जे सत्य नाही ते असत्य. जगात पंच महाभौतिक स्वरूपाचे जे निसर्ग नियम  आहेत त्या अन्वये जे काही प्राप्त आहे ते सत्य. या नियमांना छेद देऊन जे काही करण्याची इच्छा होते ते असत्य, तोच पाप संकल्प. आपला सनातन धर्म दुसरे तिसरे काही नसून या निसर्ग नियमाची म्हणजेच सत्याची नियमावली होय. 

सत्याचे विस्मरण म्हणजे माया. या माये मुळेच माणूस असत्याचा स्वीकार करतो. म्हणून दुसऱ्या ओळीत स्वामी म्हणतात हे मना, सत्याचा विचार, सत्याचे स्मरण म्हणजेच सत्याचा संकल्प सदैव जतन करून ठेव.

आता हे पाप आणि सत्य संकल्पाचे पथ्य नाही पाळले तर काय होईल? हे पुढल्या दोन ओळीत सांगितलेय. 'मना कल्पना ते नको विषयाची' याचा अर्थ हे मना तु सनातन सत्याला सोडून मायामय अशा इतर विषयांची, जे असत्य आहेत, इच्छा बाळगू नकोस. कारण असत्याच्या सेवनाने निसर्ग नियम मोडतील आणि त्याने कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक विकार (विकृती) निर्माण होतील.

जगरहाटी 'जगी वंद्य ते' मानणारी असल्याने त्यात तुझ्या ठाई निर्मिलेल्या विकृतींचा स्वीकार होणार नाही उलट तुझ्यावर छी थू  होईल. तु अस्वीकार्य अवमानित होशील. तेव्हा बापा, संकल्पांचे पथ्य पाळ आणि आपले भले करून घे.

नेहमी चांगले (सत्य) कर, वाईट (असत्य) करू नकोस त्याचे वाईटच परिणाम भोगावे लागतील हि 'आधी धरावा आचार, मग पाहावा विचार' यासाठी लागणारी मुलभूत सूचना समर्थ आपणास करून खऱ्या अर्थाने व्यवहार जागृती करतात.

जय जय रघुवीर समर्थ !

Wednesday, September 1, 2010

Shlok4

II Jai Jai Raghuveer Samarth II

Lets do with 4th Shlok. The 4th Shlok is as follows:

Mana Wasana Dushta Kama Na Ye Re I
Mana Sarwatha Pap Buddhi Nako Re II
Mana Dharmata Niti Sodu Nako Ho I
Mana Antari Sar Wichar Raho II

Swami tells 4 basic and simple instruction to human mind in this Shlok. First 3 of them are nagging instructions (things that should NOT be done) and the last is the postive insisting one.

First instruction : Wicked desires (Dushta Wasana) are never useful.
This is a very important fact that any mind full of wicked desires can never think of something positive for any one. Thus he will get accumulated with the negativity that will result him with the obvious effect. The one who makes a trap for someone (generally) gets entrapped in the same !

Second instruction : Never have thought of committing sin in mind.
Conceptually sin is every that thing that goes opposit to the law of nature. At personal level every thought that tends an individual to something not obvious and correct (i.e. against law of nature) is sin.
Committing sin can be seen at 3 levels : physical, vocal and mental. Beating someone is Physical sin. Abusing someone is vocal sin and planning conspiracy against someone is mental sin.
Swami, the very humble man, requests human mind to keep away from committing any of these sins and ever.

Third instruction : Do not go away from the holy thought in life
'Niti' is the positive thought of obvious correctness that is inspired by the nature which in turn is created by the Lord. Never ever do away from 'Niti'. Try and see that the holy thought of 'Niti' is always EXERCISED (i.e. not by chance, but by efforts). The link lies in Second Instruction, the way committing sin takes one against nature; exercising 'Niti' ensures one go by the nature.

Fourth instruction : Always keep wisdom (Sar Wichar) of good & bad, true & false, holy & unholy, natural & unnatural, proper & improper, mortal & immortal awake in mind.
An alarm of above mentioned wisdom is extremely essential and important to meet above three instructions. And every man who wants to become 'Sadhak' (student of sprituals) can always and certainly acquire the wisdom by practice.

II Shri Ram Samarth II

Sunday, June 27, 2010

Shlok3

II Jai Jai Raghuveer Samarth II

Today we shall try to discuss and learn about Shlok3 which is as follows:



Prabhate Mani Ram Chintit Java I

Pudhe Vaikhari Ram Aadhi Wadava II

Sadachar Ha Thor Sandu Naye To I

Jani Tochi To Manavi Dhanya Hoto II



Swami tells us two important things for our betterment in life.

One, about starting the day. He guides us to start our day, every day, by remebering and thinking Lord Shri Ram. Then He tells us to transform Lord's remebrance into our voice (Vaikhari) i.e. pronounce and take name of Lord Shri Ram by one's mouth. By this deed we connect our self with the Lord and that help us stay connected during entire day. This connection gives us devine feeling of being with the Lord and His grace.



Second, simply great advice is about our deeds (Achar). It is advised that we should make continuous efforts for ensuring whatever deeds we do are good and ethical (Sat) in turn our entire life will be filled by good deeds (Sat+Achar=Sadachar). Now why Sadachar? Its because every human being is generating his account of deeds (Karma) during his/her life and shall be offerred with respective results in future life by nature (meaning of nature here is Panch Mahabhoot : 5 elements of univers : Water, Air, Fire, Devine Brightness & Space occupied by Sky). Thus all situations of one's in his/her future are based on or as a result of his/her past deeds. This is as scientific as anything. This is law of nature. Isn't global warming a result of what manking has done to the earth? In short keeping ourself doing ethically good deeds shall keep us rewarded (Dhanya) in future.

We can explot this thought to every aspect and level of human life and can realise the wisdom behind the same.

II Jai Jai Raghuveer Samarth II

Sunday, June 6, 2010

Shlok 2

II Raghuveer Samarth II

Lets go through second Shlok today. Its as follows:

Mana Sajjana Bhakti Panthechi Jawe I

Tari Shrihari Pawijeto Swabhawe II

Jani Nindya Te Sarwa Sodoni Dyawe I

Jani Wandya Te Sarva Bhave Karawe II

Sadguru Samarth Ramdas Swami teaches us to guide our mind with generic Dos and Donts here. It is very important to note that the mind (Mana) is used with adjective Gentle (Sajjana). That means originally the state of mind of a human is gentle, streight forward, simple and true. If it is not directed with right Dos and prevented from Donts, it may loose its status of being gentle (Sajjana). In order to maintain this state of mind it is advised to direct our mind in the path of prayer (Bhakti Panth). And of course prayer (Bhakti) towards Lord Shriram.

The result of this direction of Bhakti to our mind is explained in second line of this Shlok. i.e. If we direct our mind in the path of prayer (Bhakti) we shall obviously get to the Lord (Shrihari). These are two simple lines that have great capability of changing one's life from within and for a noble cause.

Now to achieve this consistently and while being in inevitable public/social life another two lines speak simple rule of thumb. Third line tells that train our mind to avoid/prevent/resist/refrain from those things which are identified as BAD by the (Indian) society. And finally on the other hand, fourth line tells that accept/practise/remain with those things which are idnetified as GOOD by the (Indian) society.

Mentioning "(Indian)" as prefix to society has an intention. In India, series of Saints have guided and offerred virtues of Indian Phylosophy in simple notes in order to keep Indian people and Indian society thereby on right track that endevors the Lord. These great saints of India have embibed GOOD and BAD (Saar & Asar) into social psycho to keep a positive drive and balance in human being. Thus those characteristics identified by Indian Society are expected here. We many a times find that values of Indian Soceity are not same with the other ones.

I shall cut short this subject here as this is not the aim of the blog and summarise the meaning of Shlok that one should continously pray the Lord and that he should select from dos and donts for his own based on its social impact and acceptance.

May Samarth Ramdas Swami gives us with the strength to follow the said path.

II Jai Jai Raghuveer Samarth II